🕒 1 min read
औरंगाबादः जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील दहा कुटुंबातील ५३ व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारला आहे. हा धर्मांतर सोहळा पैठण येथील शांती ब्रम्ह संत श्री एकनाथ महाराजांच्या धर्म मंदिरात झाला. पैठण येथील नाथ महाराजांच्या वंशजांतर्फे रविवारी या लोकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध प्रकारचे हिंदू धर्मविधी करण्यात आले. त्यानंतरच त्यांना हिंदू धर्मात त्यांना जाहीररित्या स्वीकृती देण्यात आली, अशी माहिती पैठण येथील ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी दिली.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील दहा कुटुंबातील महिला, पुरुष व बालक अशा ५३ जणांनी काही दिवसांपूर्वी हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मात्र काही दिवसातच त्यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारला. यावेळी नाथांचे १४ वे वंशज रावसाहेब महाराज गोसावी, कीर्तनकार प्रफुल्लबुवा तळेगावकर महाराज, नाथवंशज तथा नाथ पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी, कमलाकर गुरू महाराज पालखीवाले, शालिवाहन नागरी बँकेचे अध्यक्ष किशोर चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती.
धर्मांतर केलेल्यांचा यावेळी शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे चौहान यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी नाथ महाराजांचे वंशज रावसाहेब गोसावी यांच्या हस्ते छोटेखानी समारंभात त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. दरम्यान ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर या लोकांना मूळ हिंदू धर्माची ओढ लागल्याने त्यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अशाच प्रकारे ५ जानेवारी रोजीदेखील आणखी ६५ महिला व पुरुष पैठण येथील कार्यक्रमात हिंदू धर्मात येतील, असी माहिती ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- गुंडांनी भगवी वस्त्र धारण केल्यास त्यांना संत म्हणता येणार नाही; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची टीका
- दक्षिण आफ्रिकेतील वनडे कर्णधारपदी केएल राहुलची होणार निवड?
- …तर राज्य सरकारने दोन दोन हात करण्याची हिंमत दाखवावी- भास्कर जाधव
- ‘मविआ’ने अल्टीमेटम देताच राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बंद लिफाफ्यात पत्र
- “केएल राहुल सध्या जागतिक क्रिकेटमधील अष्टपैलू फलंदाज”


