🕒 1 min read
मुंबई: वाईनविक्री निर्णयावरून भाजप सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये असल्याचा टोला लगावला होता. या टीकेवर आता माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (former Minister of State Sadabhau Khot) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये असल्याचे नवाब मलिक म्हणतात. व्वारे.. व्वा.. नवाब साहेब, हर्बल गांजा वाले आपली नशा सत्तेची असल्याने असं बिन बुचाचं सुचत आहे. प्रश्न कोण दारू पीत आहे हा नाही तर, दारू कुठे विक्री साठी उपलब्ध करून दिली जात आहे याचा आहे”, असे ट्वीट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
सर्वात जास्त दारू पिणारे भाजपमध्ये – नवाब मलिक
वा रे वा नवाब साहेब हर्बल गांजा वाले आपली नशा सत्तेची असल्याने असं बिन बुचाचं सुचतय!
.
प्रश्न कोण दारू पीत आहे हा नाही तर दारू कुठे विक्री साठी उपलब्ध करून दिली जात आहे ह्याचा आहे.— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) February 3, 2022
दरम्यान नवाब मलिक यांनी भाजप वाईन निर्णयाला विरोध करत आहे, मात्र अगोदर शिवराज सरकारने, गोवा, हिमाचल प्रदेश सरकारने असाच निर्णय घेतला होता की नाही हे भाजपने सांगावे. भाजप त्यांच्या नेत्यांचे दारू बनवण्याचे परवाने परत करणार का हा आमचा प्रश्न आहे. तसेच अनेक नेते मद्यही बनवत आहेत. अनेकांची तर मद्य विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे सर्वाधिक दारू पिणारे लोकं भाजपात असून भाजपने दारू पिणार नाही अशी शपथ घ्यावी, असे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “गृहमंत्र्यांच्या घरात मणिपूरच्या नेत्यांना बुट काढायला लावले…”; राहुल गांधींचा आरोप
- निकटवर्तीयांच्या ईडी चौकशीनंतर संजय राऊतांचे पुष्पा स्टाईल ट्वीट; म्हणाले, “२०२४ तक…पर हम झुकेंगे नहीं”
- मुंबई महानगरपालिकेचा या वर्षीचा शैक्षणिक अर्थसंकल्प जाहीर
- देशाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पात काय ?
- “.. पण त्यांची उपस्थिती भीतीदायक” टीम सिलेक्शन मिटिंगसंबंधी गांगुलीबाबत पुन्हा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
