अलिबाग : अन्वय नाईक प्रकरणी बुधवारी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यातही ठिकठिकाणी आंदोलन केले. महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तिघांना नगरपालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले आहे. या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता अर्णव यांच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
या तिघांनाही अलिबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या सुनावणीनंतर अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायलयात त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अर्णव यांच्या वकीलांनी ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘एकही ट्रॉफी न जिंकता कोहली आठ वर्ष कर्णधार का?’; आरसीबीच्या पराभवानंतर गंभीर भडकला
- पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या राज्यातील आमदारांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे- सुजय विखे
- ‘तुरूंगातून जामिनावर बाहेर आलेले छगन भुजबळ अलीकडे खूपच विनोदी बोलतात’
- ‘फक्त भाषणातून सांगायचं शिवसैनिक माझा श्वास आहे आणि नंतर…’
- मंत्रालयातील अधिकारी वर्गाची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याच्या कार्यवाहीस गती द्या – नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

