🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये मागील दोन वर्षांपासून मतभेद असल्याची चर्चा चांगलीच रंगू लागली. या दोन दिग्गज क्रिकेटपटूंचे मैदानातील वागणं आणि सोशल साइटवर ‘अनफॉलो’ करणे यामुळे दोघांमधील वाद सर्वांसमोर येत होते.
पण इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत दोघांची मैत्री क्रिकेटच्या पिचवर दिसून आली. कोरोनाच्या काळात विलगीकरण, क्वारंटाइनमुळे अधिकाधिक वेळ दोघांनी एकमेकांसोबत घालवला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मार्गदर्शन करीत दोघांचे मनोमिलन घडवून आणले.
विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यामध्ये मतभेद असल्याचे वृत्त सातत्याने समोर येत होते. त्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम लावण्याची नितांत गरज होती. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले. विराट कोहली व रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सातत्याने एकमेकांशी संवाद साधत होते. टी-20 मालिका संपल्यानंतर फोटोसाठीही दोघे एकत्र आले.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा


