मुंबई: भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध तिसरा आणि शेवटचा टी २० सामना जिंकत सलग दुसऱ्यांदा व्हाईट वॉश केला आहे. भारतने याआधी झालेली एकदिवसीय मालिका सुद्धा ३-० ने जिंकली होती. सोबतच आता टी २० मालिकेत सुद्धा भारतने ३-०ने विजय मिळवला आहे. भारतीय संघाने विंडीजला १७ धावांनी पराभूत केले आहे.
विंडीजने (west indies) नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजी उतरलेलंय भारतीय संघाने २० ओव्हरमध्ये विंडीजपुढे १८४ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने दुसऱ्या सामन्यांप्रमाणे भारताची ढासळती खेळी सांभाळत शानदार ६५ धावांचे अर्धशतक केले. तर त्याचं सोबतीला व्यंकटेश अय्यरने ३५ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
१८५ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा संघ २० ओव्हरमध्ये केवळ १६७ धाव करू शकला आणि भारतीय संघाने त्याना भारत दौऱ्यात दुसऱ्यांदा क्लीन स्वीप केले.विंडीजला या बहरत दौऱ्यावर दोन्ही मालिकेत एक सुद्धा सामना जिंकता आलेला नाही. सर्व फॉरमॅट मधील कर्णधार जाहीर झालेल्या रोहित शर्मा साठी त्याच्या नेतृत्वाची विजयाच्या गोडव्याने सुरुवात झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्यास एनडीएला कोणताही धोका नाही- रामदास आठवले
- “महाराष्ट्राविषयी द्वेष असणाऱ्या लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं”, संजय राऊतांचे ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण
- पालकमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का; किसननगरमधील शिवसैनिक भाजपात
- संजय राऊतांनी दिला चंद्रशेखर राव यांना कानमंत्र; म्हणाले…
- ‘तुम्ही शिवसेनेचं प्रोडक्ट आहात’; दादा भुसेंचा नारायण राणेंना खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

