🕒 1 min read
मुंबई: राज्यातील मविआ नेत्यांवर होत असलेल्या ईडी कारवाईची राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसते. त्यांनी म्हटले आहे की, “उद्या ‘ईडी’ने माझ्या मुलीला चौकशीला बोलावले तर ती आत्महत्या करेल तसेच महाविकास आघाडी घ्यायचा तो निर्णय घेईल पण मला विचाराल तर आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही.” यावरूनच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्वीट करत जोरदार प्रहार केला आहे.
“हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातले कॅबिनेट मिनिस्टर बोलत आहेत. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्राबद्दल द्वेष सरळ दिसून येतोय. ही दाऊद गॅंग बोलत आहे, तुम्ही स्वतः चालते व्हा, पाकिस्तानमध्ये तुमची गरज जास्त आहे.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातले कॅबिनेट मिनिस्टर बोलत आहेत. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्राबद्दल द्वेष सरळ दिसून येतोय. ही दाऊद गॅंग बोलत आहे, तुम्ही स्वतः चालते व्हा, पाकिस्तानमध्ये तुमची गरज जास्त आहे. https://t.co/rjJWKfaBuK
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 23, 2022
दरम्यान राज्य सरकारकडून भाजप नेत्यांची चौकशी सुरु असली तरी कोणालाही तुरुंगात टाकले आहे का? चौकशी करणे आणि धाडी टाकणे यामध्ये फरक आहे. पण आता केंद्रीय यंत्रणा थेट घरात घुसल्या आहेत. यावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते चर्चा करतील. पण मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी नवीन नियम केला लागू; ही असणार अट
- IPL 2022 : काय स्वॅग आहे..! श्रेयस अय्यरनं ठोकला ‘नो लूक’ षटकार; पाहा VIDEO
- ईडीचा ताफा मातोश्रीपर्यंत; उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याला ईडीचा झटका
- उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; मनोहर जोशींचा हवाला देत नितेश राणे म्हणाले…
- IPL 2022: आयपीएल आधी शास्त्री मास्तर संतापले ; बीसीसीआयच्या घटनेला मूर्ख म्हणत फटकारले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
