🕒 1 min read
मुंबई: राज्यातील मविआ नेते आणि त्यांच्या कुटुंबियांना ईडीकडून टार्गेट केले जात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अगोदर पासूनच म्हटले आहे. मात्र आता ईडीचा ताफा थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला आहे. ईडीने पुष्पक ग्रुपच्या (ED action taken against Pushpak Group) ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १५ फेब्रुवारी रोजी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत म्हटले हते की, “महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी तपास यंत्रणांच्या धाडी सुरुच राहतील. एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर देखील ईडीच्या धाडी पडतील”, आता संजय राऊत यांनी केलेले भाकीत सत्यात उतरले असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान यावर मातोश्रीवरून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
मात्र संजय राऊत पाठोपाठ आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याला ईडीने झटका दिला आहे. त्यामुळे यावर मविआ सरकार काय भूमिका घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. तर भाजपकडून शिवसेनेला निशाण्यावर धरले जात आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी तर थेट मनोहर जोशी यांच्या राजीनाम्यचा हवाला देत मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022: आयपीएल आधी शास्त्री मास्तर संतापले ; बीसीसीआयच्या घटनेला मूर्ख म्हणत फटकारले
- “सर्जिकल स्ट्राईकचे लवंगी फटाके फोडून…”, संजय राऊतांचा मोदींना टोला
- IPL 2022: बायकोच्या आठवणीने बुमराह व्याकुळ; म्हणाला ‘प्लिज लवकर परत ये…’
- बेरोजगार पंडितांसाठी राजकीय अश्रू ढाळणाऱ्यांनी काय केले?; संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा
- “…साकारण्याचा मोदी सरकारचा संकल्प चांगलाच, पण तो पूर्णत्वास कसा नेणार?”, संजय राऊतांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
