कोल्हापूर : महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला असतानाच काही दिवसांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना 33 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यावरून मागासवर्ग तीव्र नाराज झाला असून विरोधकांसह काँग्रेसने देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा हायकोर्टाचा निर्णय अखेर कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारं अतिरिक्त राजकीय आरक्षण आता संपुष्टात आलं आहे.
याबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आरक्षण रद्द होण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच जबाबदार असल्याची टीका केली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘गोपीचंद पडळकर यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही. ज्या माणसाची विचारसरणी अतिशय वाईट आहे, त्याला विधानपरिषदेत घेऊन शरद पवार आणि राष्ट्रवादीची बदनामी करण्यासाठीची केलेली भाजपची चाल आहे. त्यांना गरळ ओकण्यासाठीच विधानपरिषदेत घेतलं असून भाजप त्यांना प्रोत्साहन देत आहे,’ अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले होते पडळकर ?
‘महाविकास आघाडी सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही. आहे त्यांचं आरक्षणही ठेवायचं नाही. हे सर्व शरद पवारांच्या नेतृत्वात सुरु आहे. मराठा आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. पवार सत्तेत होते, मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आरक्षणाची मागणी होत आहे. पण मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही.’ असा घणाघात पडळकरांनी केलाय.
पुढे ते म्हणाले, ‘मराठा, ओबीसी आणि पदोन्नती आरक्षण रद्द होण्यास पवारच जबाबदार आहे. यांना फक्त मुलगी, पुतण्या, नातू आणि पै पाव्हण्यांचं पडलं आहे. या सरकारला बहुजन समाजाला उद्ध्वस्त करायचा आहे, असा आरोप देखील गोपीचंद पडकर यांनी केला असून आता या सरकारविरोधात बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवभक्तांनो…आपला जीव महत्वाचा, घरीच थांबा; संभाजीराजेंच एक पाऊल मागे
- पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच आहे – पाटील
- जर सगळं गावच करणार असेल तर सरकार काय करणार? ‘त्या’ स्पर्धेवरून पडळकरांचा हल्लाबोल
- डेव्हिड मिलरला विचारला धोनीबाबत प्रश्न ; उत्तर ऐकून वाटेल अभिमान
- जालन्यात १०७ नव्या रुग्णांची भर तर ४१० जणांची कोरोनामुक्ती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

