Share

गुंठेवारी नियमितीकरण; औरंगाबाद मनपात ८९० संचिका दाखल ५८८ घरांना दिली मंजूरी!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महापालिकेकडून दाखल झालेल्यांपैकी गुंठेवारी नियमितीकरणासाठी आतापर्यंत ५८८ मालमत्तांच्या संचिकांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यातून पालिकेच्या तिजोरीत ५ कोटी ३० लाख रूपयांचा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती सहायक संचालक नगररचना जयंत खरवडकर यांनी दिली. त्याचप्रमाणे महापालिकेत ८९० संचिका दाखल झाल्या आहेत.

शहरातील गुंठेवारी वसाहतीमधील मालमत्ता नियमित करण्यासाठी पालिकेने प्रभागनिहाय गुंठेवारी कक्ष स्थापन केले आहेत. त्यासाठी कर्मचारी वर्ग देेखील दिला आहे. तसेच ५२ वास्तूविशारदांचे पॅनल तयार केले आहे. या पॅनलद्वारे प्रस्ताव दाखल केले जात आहेत. गुंठेवारी कक्ष प्रमुख म्हणून नगररचना विभागाचे उपअभियंता संजय चामले यांची नियुक्ती केलेली आहे. गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करून घेण्यासाठी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पालिका करत आहे. वास्तूविशारद यांच्याकडून प्रस्ताव दाखल केले जात आहे.

आतापर्यंत ८९० संचिका दाखल झाल्या असल्या तरी त्यापैकी ५८८ संचिकांसाठी चलन भरण्यात आले असून पालिकेच्या बँक खात्यात ५ कोटी ३० लाख रूपये जमा झाले आहेत. नवीन सुधारित महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमानुसार गुंठेवारीधारकांकडून आता महापालिकेने ३० सप्टेंबरपर्यंत आपले प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी केली आहे. शासनाने दिलेल्या अर्टी-शर्तीनुसार गुंठेवारी संचिका दाखल केल्यास सात दिवसात संबंधित बांधकाम नियमित करावे अन्यथा बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्यात येईल असा इशाराच पांडेयजींनी दिला आहे. औरंगाबाद शहरात एकूण दोन लाख मालमत्तांचा यात समावेश होतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!