Share

पदवीधर निवडणुकीत घोटाळा ? अनेक मतपत्रिका कोऱ्या होत्या; भाजपचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

तर नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. या निवडणुकांमध्ये भाजपला गेली अनेक दशकं वर्चस्व असलेला नागपूर मतदारसंघ गमवावा लागला. तर, पुण्याचा बालेकिल्ला देखील भाजपच्या हातून निसटला. यासह इतर जागांवर देखील भाजपला पराभव स्वीकारत केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतपत्रिकेवरून गंभीर आरोप केले आहेत. ‘मराठवाडा आणि पुण्यात मतदानादरम्यान मत पत्रिका या कोऱ्या होत्या,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तर, यासंदर्भात आपण पुराव्यांनिशी पत्रकार परिषद घेणार असून या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चांना वेग आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!