मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (३ मार्च) पहिल्याच दिवशी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचा निषेध म्हणून राज्यपाल अभिभाषणवेळी मविआ नेत्यांनी प्रचंड गोंधळ घालत घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं अभिभाषण पटलावर ठेवत भाषण न करताच ते निघून गेले. यावरूनच त्यांच्यावर टीका केली जात आहे. तर आता यावरच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही संताप व्यक्त केला आहे.
धनंजय मुंडे यांनी म्हटले की, “राज्यपाल महोदयांना महाराष्ट्राची जनता माहीत नाही. महाराष्ट्राचे संसदीय कामकाज आणि नियम माहीत नाहीत. त्यांना महाराष्ट्राचे महापुरुष नकोयत. त्यांना अर्थसंकल्पात त्यांचं भाषण नकोय. एवढंच नाही तर त्यांना देशाचे राष्ट्रगीतही नकोय. त्यांनी केलेलं कृत्य आजपर्यंत देशाच्या संसदीय कामात कुठल्याही राज्यपाल महोदयाकडून झालेलं नाही.”
तसेच राज्यपालांचे अभिभाषण हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा महत्वाचा गाभा असतो. राज्यपालांच्या अभिभाषणातून सरकारची दिशा लक्षात येते. राज्यपालांनी अभिभाषण न करता ते पटलावर ठेवलं, भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. अभिभाषण न करता राज्यपालांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला. असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
OBC Reservation : “आरक्षण टिकवण्यात ठाकरे सरकार अपयशी”, आशिष शेलारांचे टीकास्त्र
‘लाल सिंह चढ्ढा’ पाहायचा की ‘पठाण’? चाहत्यांच्या प्रश्नांवर शाहरुख खान म्हणाला…
‘ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्याचा कट’; गोपीचंद पडळकरांचा आरोप
Womens WC 2022: ६ मार्चला रंगाणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना
- विराटच्या अंडर १९ संघाच्या कोचचा खुलासा “विराटला आयपीएलच्या पहिल्या कमाईतुन…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

