🕒 1 min read
मुंबई : कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ६ मार्च रोजी न्यूझीलँडमध्ये होणाऱ्या ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ मध्ये पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी भिडणार आहे. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची ही बारावी आवृत्ती असेल. हे मूळतः फेब्रुवारी ते मार्च २०२१ या कालावधीत नियोजित होते परंतु कोरोनामुळे ते एका वर्षाने पुढे ढकलण्यात आले. आता या महिन्यात स्पर्धेला सुरुवात होणार असून आठ संघ विजेतेपदासाठी रिंगणात आहेत. एकूण ३१ सामने खेळवले जाणार आहेत.
ICC महिला क्रिकेट विश्वचषकात (Womens WC) भारतीय संघाचा विक्रम पाकिस्तानच्या तुलनेत खूपच चांगला आहे. भारतीय संघ २००५ आणि २०१७ या वर्षात दोनदा उपविजेता ठरला आहे. दुसरीकडे, पाकिस्तान महिला संघ आजपर्यंत उपांत्य फेरीतही स्थान निश्चित करू शकला नाही. २००९ च्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर-६ फेरीत स्थान ही पाकिस्तान संघाची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यामुळे या स्पर्धेत भारताचा पाकिस्तानविरुद्धचा वर्चस्व आहे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान महिला संघ एकमेकांविरुद्ध तीन सामने खेळले आहेत. सर्व सामन्यांमध्ये भारत अव्वल स्थानावर आहे. २००९ मध्ये भारताने दहा गडी राखून पहिला विजय मिळवला होता, तर २०१३ मध्ये भारताने पाकिस्तानवर ६५ धावांनी विजय मिळवला होता. २०१७ मध्ये विश्वचषकात दोघांमध्ये शेवटची टक्कर झाली होती, भारताने हा सामना ९५ धावांच्या मोठ्या अंतराने जिंकला होता. एकदिवसीय सामन्यांमध्ये, भारत आणि पाकिस्तान प्रत्येकी १० सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत आणि भारतीय संघाने एकही सामना गामावलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
- Breaking News; ‘खाली डोकं वर पाय’ करत राज्यपालांचा निषेध
- OBC Reservation : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- विराटच्या अंडर १९ संघाच्या कोचचा खुलासा “विराटला आयपीएलच्या पहिल्या कमाईतुन…”
- ‘दाऊदला समर्थन देणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे’ – देवेंद्र फडणवीस
- OBC Reservation : “…तर ओबीसींची राजकीय हानी टळली असती”, राम सातपुतेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
