Share

बहुजन समाजातील मुलांनी यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे – पडळकर

Published On: 

🕒 1 min read

पुणे – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरचा जीव गमवावा लागला होता. त्यांनतरही या प्रस्थापितांच्या सरकारनं ना नियुक्त्या दिल्या ना पदभरत्या केल्या असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच रिक्त पदे जास्त असूनही ठाकरे सरकारने लोकसेवा आयोगाकडे पदभरतीसाठी कमी जागांची मागणी केली असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे.

पडळकर म्हणाले, आतातर यांनी वेगवेगळ्या वीस विभागातील ११,३५१ पद रिक्त असताना मात्र लोकसेवा आयोगाकडं फक्त आणि फक्त ४,२६४ रिक्त पदांच्या पदभरतीची मागनी केली. यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे कोविडच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात सर्वच श्रेणीतील पद २५०० च्या आसपास पद रिक्त असताना अमित देशमुखांच्या खात्यानं लोकसेवी आयोगाला काहीच मागनी केली नाही.. हीच बोंब अनके खात्यांची आहे.

प्रशासन व सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. हे काय फक्त  एकमेकांसोबत टक्केवारीच्या फुगड्या खेळतायेता का?  स्वताची मुलं, नातू, आमदार खासदार होण्यापुरतं फक्त प्रस्थापितांकडं रिक्तपदे असतात पण बहुजन समाजातील मुलांनी मात्र यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे अशी घणाघाती टीका पडळकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!