Share

ब्रेकिंग : अखेर मंदिरांची दारे उघडणार; मुख्यमंत्री ठाकरेंनी केली तारखेची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने ठाकरे सरकारने बऱ्यापैकी निर्बंध कायम ठेवले होते. तर, मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने तीव्र आंदोलने केली होती. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी देखील आंदोलनांमध्ये सहभाग घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता.

आता गणेशोत्सव काळानंतर देखील कोरोना स्थिती आटोक्यात असताना सरकारने दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. येत्या ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. तर, काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंदिरे खुली करण्यास देखील परवानगी दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

‘नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. नवरात्रीच्या पाहिल्याच दिवशी प्रार्थना स्थळे खुली होणार असल्याने भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!