Share

दिलासादायक बातमी : देशातील नवीन रुग्णांची संख्या पाच दिवसात पहिल्यांदाच झाली कमी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट देशासाठी अत्यंत त्रासदायक ठरली आहे. या लाटेत रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांनी अंशत: लॉकडाऊनही लावला आहे. मात्र, त्याचा परिणाम आता दिसून आला आहे. देशात कोरोना रुग्ण संख्येत काही प्रमाणात घट होत असल्याचे दिसून आले. गेल्या पाच दिवसात पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात देशात ३ लाख ६६ हजार ३१७ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५३ हजार ५८० रुग्णांनी कोरोनावर मात केली.

रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी देशातील मृत्यूचा आकडा अजूनही जास्तच आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे ३ हजार ७४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील १४ पेक्षा जास्त राज्यांनी लॉकडाऊन लावलेले आहे. यामध्ये महाराष्ट्रासह पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार या राज्यांचा समावेश आहे.

पश्चिम बंगालसह पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे देखील कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे ऑक्सिजन आणि इतर सुविधांची कमतरता भासत होती. ती देखील आता काही अंशी कमी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!