Share

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; ‘या’ रेल्वेतील काही डब्बे पूर्णपणे अनारक्षित होणार!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : नांदेड रेल्वे विभागातील २० विशेष रेल्वेगाड्यांमधील काही डब्बे पूर्णपणे अनारक्षित करण्यात आले आहेत. रेल्वे प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. कोरोनाच्या गेल्या दिड ते दोन वर्षांच्या काळात अनारक्षित रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे साधारण परिस्थिती असलेल्या तसेच गरजू प्रवाशांचे मोठे नुकसान होत होते. आता रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचे सामान्य नागरिकांमधून स्वागत करण्यात येत आहे.

२७ ऑगस्ट नरसापूर ते नगरसोल डी एल १, २ तर २८ ऑगस्ट रोजी याच क्रमांकाचे डबे नगरसोल – नरसापूर रेल्वेत अनारक्षित असतील. याच दोन दिवशी औरंगाबाद ते रेनीगुंठा आणि रेनीगुंठा ते औरंगाबाद रेल्वेत डी एल १ आणि २ डबे अनारक्षित राहतील. ३०, ३१ ऑगस्टला काचीगुडा -अकोला आणि अकोला – काचीगुडा रेल्वेत डब्बा क्रमांक डी एल १ आणि २ हे जनरल डबे असतील.

२७ ऑगस्ट रोजी नांदेड औरंगाबाद रेल्वेतील डी एल १ आणि २ व एस ४ आणि ९ अनारक्षित असतील. याच क्रमांकाचे डब्बे ३० ऑगस्ट रोजी औरंगाबाद ते नांदेड रेल्वेत अनारक्षित राहणार आहेत. काेराेना काळात गर्दी हाेत असल्याने रेल्वे प्रशासनाकडून स्थानकावर तिकिट देणे बंद करून सर्व गाड्या आरक्षित करण्यात आल्या हाेत्या. रुग्णसंख्या कमी हाेत असल्याने आता अनारक्षित डबे जाेडून रेल्वे प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!