मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामन्याकडे लागले आहे. येत्या २ जुन रोजी भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. त्याआधी भारतीय संघाला मुंबईत विलगीकरणात रहावे लागणार आहे.
यानंतर इंग्लंडला गेल्यानंतर भारतीय संघाला पुन्हा एकदा विलगीकरणात रहावे लागणार आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय संघाला १० दिवस विलगीकरणाचा कालावधी पुर्ण करावा लागणार आहे. मात्र नुकत्याच बीसीसीआयने केलेल्या विनंतीनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने विलगीकरणाचा कालावधी कमी करत १० ऐवजी ३ दिवसांवर आणला आहे. याबरोबरच भारतीय खेळाडूंना चौथ्या दिवसांपासून सरावाची परवानगी दिली गेली आहे.
भारताचे पुरुष आणि महिला क्रिकेट संघ एकाच विमानातून इंग्लंडला रवाना होणार आहेत. पुरुष संघाला न्यूझीलंड विरुद्धजागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. १८ ते २२ जून या कालावधीत होणारा हा सामना साउथम्पटनच्या मैदानावर रंगणार आहे. यानंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. दुसरीकडे भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी ब्रिस्टलला जाणार आहे. यानंतर महिला संघ एकदिवसीय आणि टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बीडमध्ये मान्सूनपूर्व आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम
- निष्काळजीपणा शिगेला! ऑक्सिजन बंद पडलं, सांगून सुद्धा दुर्लक्ष
- वयाच्या ४५व्या वर्षी ‘या’ खेळाडूने केली शतकीय खेळी, चौकार आणि षटकारांचा पाडला पाऊस
- मोदी सरकार ‘ट्विटर’च्या भूमिकेवर नाराज, एकतर्फी निर्णय न घेण्याचा सल्ला
- आयपीएल स्थगित झाली नसती तर मी पण स्पर्धा अर्ध्यातून सोडली असती : युजवेंद्र चहल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

