🕒 1 min read
औरंगाबादः आता नांदेड, जालना, औरंगाबादहून पुण्याला जाणे अधिक सोप्पे होणार आहे. पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिली. मराठवाड्यातील प्रवाशांच्या दृष्टीने ही मोठी आणि आनंदाची बातमी असून १ जानेवारीपासून ही रेल्वे सुरु होणार आहे. ही रेल्वे आठवड्यातून दोन दिवस धावेल आणि नंतर ती संपूर्ण आठवडाभर धावेल, असेही सांगण्यात आले आहे. येत्या आठवड्यात याबाबत परिपत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
बोर्डाकडून औरंगाबाद-अंकाई या ९८ किलोमीटर दुहेरीकरणासाठी सर्व्हे करण्यासाठी आदेश काढण्यात आले आहे. त्यामुळे औरंगाबाद-अंकाई दुहेरीकरणाचा मार्ग लवकरच मोकळा होईल. आणि लवकरच दुहेरीकरण होईल अशी अपेक्षा देखील आता व्यक्त केली जात आहे. दिल्ली बोर्डाचे पंकजकुमार यांनी औरंगाबाद ते अंकाई दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाबद्दल सिकंदराबाद रेल्वे बोर्डाला पत्राद्वारे आदेश दिले आहे.
त्यासाठी १ कोटी ९६ लाख रुपये सर्वेक्षण करण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे आता दुहेरीकरण करण्यासाठी मार्ग मोकळा होऊन लवकरच औरंगाबाद ते अंकाई दरम्यान दुहेरीकरण होईल. अशी अपेक्षा अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. औरंगाबाद ते अंकाई या ९८ किलोमीटर दुहेरीकरणासाठी अंतिम सर्वे आज मंजूर केला आहे. त्यामुळे येणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये यासाठी निधी मंजुरी साठीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद-अंकाई दुहेरीकरण करण्यासाठी मार्ग लवकरच होईल अशी अपेक्षा आहे. अशी मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अपेक्षा अनंत बोरकर यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना छोटी गोष्ट’; ‘या’ मुख्यमंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
- भातखळकरांच्या ‘त्या’ टीकेवर सचिन सावंत यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘इंग्रजांचे पाय…’
- द. आफ्रिका दौऱ्यासाठी शिखर धवनचा भारतीय संघात समावेश करावा; माजी क्रिकेटपटूचे वक्तव्य
- सहकारातील अडचणी दूर करण्यासाठी अमित शहांचा महाराष्ट्र दौरा- देवेंद्र फडणवीस
- …हे नाकर्ते खंडणी सरकार अजून किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार आहे?- अतुल भातखळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
