Share

‘गोकुळ’च्या निवडणुकांवर कोरोनाच सावट; निवडणुकीचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात !

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर :  गेले काही महिने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने मात्र निवडणूक व्हावी अशी मागणी उचलून धरली होती. यांनतर, काही दिवसांपूर्वी गोकुळच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

२ मे रोजी निवडणूक पार पडणार असून जिल्ह्यातील आर्थिक केंद्र असलेल्या या दूधसंघावर सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी महाडिक-पी.एन पाटील गटाविरुद्ध शाहू विकास आघाडी असा सामना रंगणार असल्याने चुरस वाढली आहे. गेले वर्षभर लांबलेली निवडणूक २ मे रोजी होणार असतानाच पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा हाहाकार वाढत आहे. त्यामुळे आता पुन्हा निवडणूक रद्द करण्याची मागणी होते आहे.

यासंदर्भात काहींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन निवडणूक रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली असून यावर आज सुनावणी होणार आहे. गोकुळचे काही ठरावदार पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा आटोक्यात असला तरी या निवडणुकांमुळे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!