Share

मतदाराला दोन हजार रुपयांची एक नोट दिली तरी आता सहज मत विकत घेता येते

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदी जाहीर केली. मात्र, नोटाबंदी हा राजकीय कट असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या राजकीय कटामुळे मोदी यांनी मतदारांचे मत विकत घेण्याचे काम अधिक सोपे केले आहे असं मत नायडू यांनी व्यक्त केलं आहे. विशाखापट्टनममध्ये सुरू असलेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह साऊथ 2018 मध्ये नायडू बोलत होते.

खिशात दोन हजाराचे एक बंडल घेऊन फिरले आणि मतदाराला एक नोट दिली तरी आता सहज मत विकत घेता येते. या उद्देशानेच त्यांनी दोन हजार रुपयांची नोट आणली आसा आरोपही त्यांनी केला. यासाठीच आपण नोटाबंदीला विरोध केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण पाच वर्षे जनतेची सेवा केली आहे. जनहिताची अनेक कामे आपल्या सरकारने केली आहेत त्यामुळे मते विकत घेण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, असेही ते म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!