🕒 1 min read
माजलगाव : मराठवाडा हा दुष्काळी प्रदेश आहे. मागील काही वर्षांपासून मराठवाड्याच्या जनतेला पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दिवसांदिवस या समस्येमध्ये भर पडत चालली आहे. पण या समस्येला राज्य सरकार ही तितकेसे गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आपण बघत आहोत. याच समस्येचा पाढा माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्या वळवून त्याचे पाणी मराठवाड्याला द्यावे अशी मागणी केली.
आ. सोळंकी यांनी विधानसभेत बोलताना,”मराठवाडा हा भाग दुष्काळग्रस्त आहे. याठिकाणी दरवर्षी टँकरने पाणी पुरवावे लागते. कायमचा दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांचा परिणाम या भागावर झाला आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्या वळवून त्याचे पाणी मराठवाड्याला द्यावे, वेळप्रसंगी सिंचन विभागाने नदीजोड प्रकल्पांद्वारे हा प्रश्न मार्गी लावावा.” अशी मागणी केली.
पुढे बोलतांनी त्यांनी राष्ट्रीय बांबू मिशन मध्ये झालेल्या गैरव्यवहार बदल चौकशीची मागणी केली. “राष्ट्रीय बांबू मिशनची स्थापन आपल्या देशात झाली. या माध्यमातून बांबू विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. या महामंडळातील हितेश रेड्डी या अधिकाऱ्याकडून अनेक गैरव्यवहार घडल्याचे समोर आले आहेत.” याची चौकशी करण्यात यावी.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत आजपासून अंशत: लॉकडाऊन; रात्री ९ पर्यंतच दुकाने सुरू राहणार
- इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका ; भारतीय संघव्यवस्थापनासमोर खेळाडू निवडीचा प्रश्न
- ‘टाइमपास’चे दोन्ही दगडू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘लव सुलभ’ मध्ये पुन्हा एकत्र
- ‘इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी राहुल ऐवजी पंतला संधी मिळायला हवी!’
- औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या पाचशेपार, ७ जणांचा मृत्यू


