Share

इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका ; भारतीय संघव्यवस्थापनासमोर खेळाडू निवडीचा प्रश्न

Published On: 

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड या उभय संघात येत्या १२ मार्चपासून पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. भारताला इंग्लंडविरोधात पाच सामान्यांची टी20 सीरीज खेळायची आहे. सीरीजचे सर्व सामाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. या स्टेडियमवर दोन्ही टीम्सनी शेवटचे दोन टेस्ट मॅच खेळले होते. टी 20 सीरीजची पहिली मॅच शुक्रवारी खेळली जाणार आहे.

या मालिकेत भारतीय संघव्यवस्थापनासमोर अंतिम अकरामध्ये कोणत्या क्रिकेटपटूंना संधी द्यायची, हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. प्रत्येक स्थानासाठी टीम इंडियामध्ये कमालीची चुरस दिसून येत आहे. सलामीवीर, चौथा क्रमांक, यष्टिरक्षक व गोलंदाजी या चार विभागांत कोणत्या खेळाडूंना अंतिम अकरामध्ये चान्स देण्यात येईल हे पाहणे रंजक ठरणार आहे. फलंदाजी विभागात लोकेश राहुल, श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव आणि गोलंदाजी विभागात भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर व दीपक चहर यांच्यात रस्सीखेच लागताना दिसणार आहे.

रिषभ पंतने कोरोनानंतरच्या काळात जबरदस्त फलंदाजी करीत कसोटीप्रमाणे झटपट क्रिकेट मालिकांसाठी टीम इंडियाच्या संघात कमबॅक केले आहे. पण यामुळे समीकरणे बदलली आहेत. लोकेश राहुल यष्टिरक्षक व फलंदाज अशा दोन्ही भूमिका बजावत असे. मात्र आता रिषभ पंतचा संघातील समावेश पक्का आहे. त्याच्या खांद्यावर यष्टिरक्षकासोबतच प्रमुख फलंदाजांचीही जबाबदारी असेल. त्यामुळे लोकेश राहुलकडे सलामीवीराची भूमिका सोपवण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!