Share

१० वी नंतर तीनच वर्षात मिळवा रोजगार; औरंगाबादेत पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांची पहिली पसंती!

Published On: 

औरंगाबाद : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पॉलिटेक्निकला पसंती देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नुकतीच पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची पहिली फेरी १८ सप्टेंबरपासून घोषीत झाली आहे. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. मराठवाड्यातील पॉलिटेक्निकच्या ५६ संस्थांमधील एकूण १५ हजार ९२५ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

दरवर्षी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असतो. रोजगार मिळवून देणारा अभ्यासक्रम म्हणून पॉलिटेक्निककडे पाहिले जाते. यंदाही एकूण १५ हजार ९२५ जागांसाठी तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या फेरीची घोषणा १८ सप्टेंबर रोजी झालेली आहे. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना आता २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच प्रवेश निश्चित करावे लागणार आहे.

पहिल्या फेरीतील यादीत ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या ऑप्शनवर नंबर लागला असेल, त्या विद्यार्थ्यांना २२ तारखेपर्यंत प्रवेश करणे अनिवार्य आहे. दहावीनंतर पॉलिटेक्निकला प्रवेश घेतल्यास पॉलिटेक्निकची दोन वर्षे आणि पुढे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. त्यामुळे इंजिनिअरिंगची चार वर्षे, असे एकूण सहा वर्षात इंजिनिअरिंगची पदविका आणि पदवी अभ्यासक्रम पूर्ण होतो. दहावी नंतर तीनच वर्षात विद्यार्थ्यांना रोजगार, नोकरी मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा याकडे अधिक दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!