🕒 1 min read
अबू धाबी : दुबई येथे होत असलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या हंगामाच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. अबू धाबीच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात आरसीबीचा संघ निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानावर उतरला होता. त्यांच्या या जर्सीचा रंग बघून सगळ्यांनाच प्रश्न पडला. ज्याचे उत्तर कर्णधार विराटने दिला. जे ऐकू सगळ्यानाच त्यांचे अभिमान वाटले आहे.
https://www.instagram.com/p/CUCIusxhwG5/
आरसीबीची मुळात जर्सी लाल रंगाची आहे. ते दरवर्षी एक दिवस पर्यावरणासाठी हिरव्या रंगाची जर्सी परिधान करत असतात. यंदा मात्र त्यांनी पहिल्याच सामन्यात निळ्या रंगाची जर्सी घातली. याबाबत नाणेफेक दरम्यान विराटला विचारले असता त्याने सांगितले आहे. गेल्या दीड वर्षांपासून भारतासह संपूर्ण जग कोरोना या घातक विषाणूला सामोरे जात आहे. या महामारीला लढा देताना कोव्हीड योद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांचा जीव वाचवत आहेत. त्यामुळे कोव्हीड योद्धांचा सन्मान म्हणून जसा पीपीई किटचा निळा रंग अशी निळी जर्सी परिधान केली होती.
https://www.instagram.com/p/CUC3x6zhdmU/
आरसीबीच्या सोशल नेटवर्किंग अकॉउंटवरही त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात आरसीबीचे खेळाडू निळी जर्सी घालून कोव्हीड योद्धांना सॅल्यूट करत आहेत. त्यांच्या टीम बसवरही खेळाडूंचा निळा जर्सीत फोटो काढलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवार मोठे नेते नाहीत, शरद पवारांमुळे मिळालेल्या संधीची त्यांनी घाण केली-निलेश राणे
- राज्यकर्ते अराजकता माजवत आहेत आणि जनता असहाय्य आहे, न्याय कुणाकडे मागावा ?
- महंत नरेंद्र गिरी प्रकरणात मी दोषी असल्यास मला कायद्याप्रमाणे शिक्षा द्या – आनंद गिरी
- चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही; नाना पटोले यांचा घणाघात
- ‘राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत,आम्ही शिवसैनिकच आहोत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
