पुणे : कालच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा टाकण्यात आला होता. त्याची चौकशी चालू असतानाच उरली कांचन मध्ये आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोन अस्सल गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गोळीबाराची घटना घडली. ही घटना तळवेडे चौकात घडली. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. या गोष्टीमुळे पुण्यातील गुन्हेगारांना कायद्याचा वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काल महाराष्ट्र बँक पिंपरखेड येथील शाखेवर ५ ते ६ दरोडेखोरांनी बँकेच्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून बँकेतील सर्व सोने आणि रोकड लुटून नेली. अशातच आज उरुळी कांचन येथे दोन गुन्हेगार टोळींमध्ये पूर्ववैमनस्यातून भरदिवसा गोळीबार करण्यात आला. यामध्ये ३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळीयुद्ध भडकल्याचे समजते आहे.
अप्पा लोंढे गँग आणि विरुद्ध असलेल्या टोळीमध्ये ही फायरिंग झाली असे म्हंटले जात आहे. यामध्ये संतोष जगताप याचा फायरिंग दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नेमका गोळीबार हा कोणत्या कारणामुळे झाला हे अजून पर्यंत स्पष्ट झालेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आघाडीवर नाराज अन् भाजपवर खुश असं काही नाही; जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझं धोरण’
- ‘..याचा अर्थ लसींसाठी महाविकास आघाडी सरकारची रडारड खोटी होती’, भाजपची टीका
- ‘नितीन राऊतांनी माफी मागावी अन्यथा मुख्यमंत्री ठाकरेंनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा’
- शिवसेना महिला आघाडीने केला संघटना बळकट करण्याचा ‘वज्रनिर्धार’!
- ‘तुमची पंधरा काम आणि माझं एकच काम, ते करा’, अशोक चव्हाणांचे मतदारांना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

