जालना : अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माणासाठी जालन्यातून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात आला आहे. जिल्ह्यात ९६२ गावे आणि वाड्यावस्त्यांवर जाऊन रामभक्तीनी महिनाभरत १३ कोटी ३८ लाख रुपये निधी संकलीत केला आहे. श्री राम जन्मभूमी मंदिर समर्पण निधी संकलन समितीचे स्थानिक उपाध्यक्ष जयमंगल जाधव यांनी दिली आहे.
अयोध्येतील श्री राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून निधी संकलीत करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालन्यात देखील समर्पण निधी समितीची स्थापना करण्यात आली होती. ज्येष्ठ उद्योजक घनशाम गोलय हे या समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा मार्गदशनाखाली जिल्ह्यातील जवळपास सर्व गावांमध्ये रामभक्तांनी भेटी देऊन राम मंदिर उभारणीसाठी देणगी स्विकारल्याचे, पत्रकार परिषदेत जयमंगल जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, जालन्यातील व्यापारी, उद्योजकांसह सामान्य नागरिकांनी आपापल्या पद्धतीने निधी देऊन राम मंदिर निर्माणासाठी हात भार लावला. तसेच निधी संकलनादरम्यान विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादमध्ये कोरोनाचे २५६ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू; ७१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज
- डेटिंग साइटवर वाद झाल्याने पुण्यात जालन्याच्या तरुणाचा खून; दोन जण ताब्यात
- व्यापाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न करणारे ५ जण अटकेत; दोन कोटींच्या खंडणीसाठी आखला प्लॅन
- हळदीच्या नवीन वाणाची निर्मिती करण्याच्या संशोधन समितीच्या पुण्यातील बैठकीत सूचना
- ‘यशवंत पंचायतराज’मध्ये हिंगोलीची उत्कृष्ट कामगिरी; पुणे आयुक्तलयाचे पथक आज हिंगोलीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
