जालना : जालन्यात व्यापारी राजेश सोनी यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरणाचा प्लॅन आखला असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना विविध ठिकाणांहून अटक केली. दोन गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, एक खंजीर आणि एक कार असा १२ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.
अपहरणासाठी आरोपी सर्वप्रथम रेल्वेने पुण्याला गेले. त्यानंतर तेथून ईर्टिगा वाहन भाड्याने घेतले. पुण्याच्या बाहेर आल्यानंतर चालकाला मारहाण करून त्याला गाडीबाहेर फेकून दिले. नंतर गाडीची नंबर प्लेट काढून ती गाडी घेऊन जालन्याला आले. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी नाव्हा रोडवरील दत्त मंदिराच्या पार्किंगमध्ये राजेश सोनी यांच्या प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र बाबासाहेब राऊत ऊर्फ राजन बाबूराव मुजमुले (२६, परतूर), विशाल संजय जोगदंड (२०, मजुरी, रा. जोगदंड मळा, जालना), भागवत ऊर्फ संभ्या बालाजी राऊत, पांडुरंग ऊर्फ ओम बबन राऊत (२४, वैद्यचा मळा, जालना), मोहंमद इरफान मलिक (पडेगाव कासमगल्ली दर्गा, औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी व्यापारी राजेश भगवानदास सोनी हे दुपारी १२ वाजेच्या सुमारास नाव्हा रोडवरील दत्त मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी विना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून डीत बसण्यास सांगितले. मात्र, संशय आल्याने परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाल्याने आरोपींनी घाबरून तेथून पळ काढला.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादमध्ये कोरोनाचे २५६ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू; ७१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज
- डेटिंग साइटवर वाद झाल्याने पुण्यात जालन्याच्या तरुणाचा खून; दोन जण ताब्यात
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
