Share

ब्रिस्बेनपासून चंदनापुरीपर्यंत रहाणेंचाच डंका; गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीतही रहाणे पॅनेल विजयी!

Published On: 

अहमदनगर:- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. 34 जिल्ह्यांमधील जवळपास 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले होते. याचा काल (18 जानेवारी) निकाल लागला आहे.

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीतील गुलाल खाली बसण्यापूर्वीच, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने ब्रिस्बेनमध्येही गुलाल उधळला आहे. महाराष्ट्रात एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम असताना, तिकडे महाराष्ट्राचा सुपुत्र अजिंक्य रहाणे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचं खंबीर नेतृत्त्व करत होता. भारताने चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला आहे. अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाने 3 विकेट्स राखून धडाकेबाज विजयाची नोंद केली.

दरम्यान, अजिंक्य रहाणे हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातला आहे. चंदनापुरी हे त्याचं गाव आहे. चंदनापुरीतही रहाणेंच्या पॅनेलने विजय मिळवला आहे. गावच्या या निवडणुकीत अजिंक्य रहाणेच्या घरातील किंवा नातेवाईक कोणीही उमेदवार नव्हतं. पण अजिंक्य रहाणेच्या या गावातील निवडणुकीकडे पंचक्रोशीचं लक्ष होतं.

या निवडणुकीत रामनाथ रहाणे यांच्या शेतकरी विकास मंडळाने बाजी मारली असून 13 पैकी तब्बल 10 जागांवर विजय मिळवून सत्ता काबीज केली आहे. त्यांच्या विरोधातील ग्रामविकास मंडळाला तीन जागा मिळाल्या. या पॅनलचं नेतृत्त्व रामभाऊ रहाणे करत होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!