अहमदनगर : संगमनेर शहरातील तीन बत्ती परिसरात काही उपद्रवी नागरिकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. या हल्ल्यातील सुमारे २२ पेक्षा अधिक आरोपींची ओळख पटवण्यात यश आले आहे. त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना काही मोकाट नागरिकांनी विनाकारण पोलिसांवर हल्ला केला. या घटनेचा राज्यभरातून निषेध होतोय. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना मारणाऱ्या समाजकंटकावर तीव्र कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरतेय. या प्रकरणी सत्ताधारी राजकीय नेत्यांनी डोळेझाक केले असले तरी नागरिकांच्या दबावामुळे पोलिसांनी आरोपींवर कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासून आरोपींच्या परिसरात छापासत्र सुरू केले होते. या प्रकरणातील मुसेब अलाउद्दीन शेख (वय 31, रा. अपनानगर), आसिफ मेहबूब पठाण (वय 31, रा. मोगलपुरा), युनूस मन्सूर सय्यद (वय 24, रा. गवंडीपुरा) व मोसीन इमाम शेख (वय 35, रा. जम्मनपुरा) या चौघांना अटक करण्यात आली. हल्ला करण्यात पुढे असणारे काही समाजकंटक मात्र अटकेच्या भीतीने पसार झालेत. या चौघांच्या चौकशीतून पोलिसांना अन्य संशयितांच्या माहितीसह इतरही गोष्टींची उकल करता येणार आहे.
मोगलपुरा भागात गुरुवारी कोरोनाचे नियम डावलून गर्दी झाली होती. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी धाव घेतली. मात्र, त्या जमावानेच पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत एका खासगी वाहनाची काच फुटली, तसेच अन्य वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांना केलेल्या धक्काबुक्कीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात जनक्षोभ निर्माण झाला. घरदार सोडून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोका पत्करून काम करणाऱ्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचा विविध क्षेत्रांतून निषेध करण्यात येतोय.
महत्वाच्या बातम्या
- लता मंगेशकर यांनी जम्बाे कोविड रुग्णालयाच्या कामाचे पत्र लिहीत केले कौतुक
- जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
- रुग्णसेवेत कसलीही तडजोड नको; आरोग्य सेवा दर्जेदार असावी, राजेश टोपेंचे वक्तव्य
- काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी केली कोरोनावर मात, लवकरच डिस्चार्ज मिळणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
