Share

Sudhir Mungantiwar। नक्षलग्रस्त भागात पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी भारत बटालियन-4 ची स्थापना – सुधीर मुनगंटीवार

Published On: 

🕒 1 min read

चंद्रपूर : नक्षलग्रस्त भागात पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी भारत बटालियन-4 ची स्थापना करण्याचा निर्णय झाला असून, यासाठी एक हजार सात पदांना मंजुरीही देण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ही बटालियन चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी कार्यरत असेल.

जेव्हा-केव्हा पोलिसांना तातडीच्या मदतीची गरज असेल, तेव्हा ही बटालियन तातडीने त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना सहकार्य करेल आणि प्रत्यक्ष कृती करेल. यात उपरोक्त तीन जिल्ह्यातील युवकांचा समावेश केला जाणार आहे. या बटालियनच्या मुख्यालयासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील कोर्टी मक्ता येथे जागा मंजूर करण्यात आली असून, लवकरच पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहितीही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!