पुणे : काल शहरातील कोथरूड उपनगरातील महात्मा सोसायटीत रानगवा आला असल्याचे तेथील रहिवाशांनी कळवले होते. वनविभाग आणि अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. वनविभागाने तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर रानगव्याला पकडले, मात्र काही वेळातच या प्राण्यानं आपला जीव सोडला.
सुमारे 5 तासांच्या धुमाकूळानंतर इंदिरानगर परिसरात गव्याला पकडण्यात वनविभागाला यश आले खरे, मात्र नंतर गव्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.गव्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबद्दल चर्चांना उधान आले होते. दरम्यान रानगवा रस्ता चुकल्यामुळे बिथरला, बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे तो सैरावैरा धावू लागला. मात्र गवा बिथरल्याने तेथील बंगल्यांच्या भिंतींना धडका देत होता. त्यामुळे नाक, तोंडाजवळ जखम झाल्यामुळे रक्त वाहत होते.
मानवी वस्तीतुन बाहेर पाडण्यासाठीची धडपड अखेर निष्फळ झाली व या मुक्या प्राण्याला प्राण गमवावे लागले. सोशल मीडियातून या गव्याला श्रद्धांजली देत माणसांच्या वर्तनावर ताशेरे ओढण्यात आले होते. ती गर्दी व गोंधळ झाला नसता तर कदाचित रानगव्याचा जीव वाचला असता. या गव्याच्या मृत्यूनंतर त्याला अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
पुण्यात पासोड्या विठ्ठोबा, बुधवार पेठ येथे ‘आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार’ असा फेल्क्स पुण्यात लावले आहे. इतकेच नव्हे तर रानगव्याचा मोठा पुतळा उभा करुन श्रध्दाजंली वाहण्यात आली आहे. प्रसिद्ध उद्योजक मुरुडकर झेंडेवाले व फ्लॅग फॉऊडेशने शोकसंतप्त होऊन हे पाऊल उचलले आहे. किमान यामुळे माणसांना आपल्या चुकीची जाणीव होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- मी पुन्हा येणार; तृप्ती देसाईंचं शिर्डी संस्थानला आव्हान!
- ‘मेधा पाटकरांना सुपारीबाज म्हणणारे भातखळकर हे लाचार नेते’, युवक कॉग्रेसचा प्रहार
- राज्य सरकारने घोषणा केलेल्या शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये
- ‘मेधा पाटकरांना सुपारीबाज म्हणणाऱ्या भातखळकरांच्या डोक्यावर परिणाम झालाय’, राष्ट्रवादीचा घणाघात
- शरद पवार पंतप्रधान होणार? अजित पवार म्हणतात…’माझ्या कानावर अजून काही नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
