🕒 1 min read
सध्या नवरात्री उत्सव सुरू आहे. हा उत्सव नऊ दिवसांचा असतो. या दिवसांमध्ये अनेकजण उपवास करत असतात. काहीजण उठता-बसता उपवास म्हणजेच देवी स्थापन होण्याचा दिवस आणि देवी उठण्याच्या दिवशी करतात. तर काही संपूर्ण नऊ दिवस उपवास करत असतात. या उपवासाच्या दिवसांमध्ये केवळ काही ठराविक पदार्थच खाल्ले जातात. यामध्ये साबूदाणा, वरई अशा पदार्थांचा जास्त समावेश असतो आणि हे पदार्थ पचण्यात जड असतात. त्याचबरोबर या काळात पाणीही जास्त प्यायले जात नाही. त्यामुळे काहींना अशक्तपणा येतो. जर आपले शरीर हायड्रेटेड नसेल तर अशी लक्षणं दिसू लागतात. तर आज आम्ही तुम्हाला काही असे काही उपाय सांगणार आहोत जे प्यायल्याने तुमची बॉडी हायड्रेटेड होण्यात मदत होईल.
बॉडी हायड्रेटेड ठेवण्याचे उपाय –
1. दही –
दह्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. जे उपवासाच्या वेळीही शरीराची उर्जा टिकवून ठेवतात तसेच तुम्हाला हायड्रेटही ठेवण्यात मदत करतात. त्यामुळे उपवासाच्या वेळी दह्याचे सेवन करा.
2.नारळ पाणी –
नारळाच्या पाण्यात असलेले पोटॅशियम शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. त्यामुळे आपले पोट साफ राहते आणि त्वचाही चमकदार होते.
3. काकडी –
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यासोबतच त्यामध्ये असलेले घटक शरीरातील टॉक्सिन्सही काढून टाकतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी काकडीचा आहारात समावेश करा.
महत्वाच्या बातम्या :
- Kishori Pednekar | “स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवून दुसऱ्याच्या बाळाला…”; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर निशाणा
- Shivsena Vs Shinde | सत्ता संघर्षाचा निकाल तब्बल एक महिना लांबला, ‘या’ तारखेला होणार निर्णय
- Bacchu Kadu | “मी कानशिलात लगावली नाही तर…” ; ‘त्या’ VIDEO वर बच्चू कडूंचे स्पष्टीकरण
- Congress । गहलोत, शशी थरुर यांच्यानंतर आता अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये ‘हे’ नाव आहे सर्वात जास्त चर्चेत!
- Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांची मोठी घोषणा, ‘या’ ठिकाणी घेणार दसरा मेळावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

