Share

घरावर दगड मारायला पाचशे-पाचशे लोक आले, त्यावर बंदी नाही घातली; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Published On: 

दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन कोकणातील बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाच्या उदघाटनाची घोषणा करण्यासह विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सणांसह मंदिरे बंद ठेवण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.

‘फक्त हिंदूंचा सण-उत्सवांवर बंदी का ? माझ्या घरावर पाचशे-पाचशे लोक दगडफेक करायला आले, त्याला बंदी का नाही घातली ? त्यांच्यामुळे कोरोना होत नाही का ? उलट मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. हे कोणत्या विचारसरणीचे मुख्यमंत्री ? असे सवाल करत राणे यांनी ठाकरेंना लक्ष्य करतानाच यांना भीती दाखवून घरात बसायचं आहे,’ असा खोचक टोला देखील लगावला आहे.

आरोग्य केंद्र बंद करून मंदिरं उघडू का? – ठाकरे

‘आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. यासाठी जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. धार्मिक स्थळं उघडली पाहीजेत, हरकत नाही. कपिल पाटीलजी तुमच्याकडे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे ना, कि त्याच्या बाजूला मी मंदिरं उघडू. आरोग्य केंद्र बंद करून. आज आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत,’ असं देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!