नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदी सरकारने पहिल्याच बैठकीमध्ये आरोग्यासाठी २३ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी नवे चेहरे समोर आले. या आधी मोदी सरकारच्या निर्णयांची माहिती देण्यासाठी रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर समोर येत होते. आता ही जबबादारी माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्याने आरोग्य मंत्रालय सोडवे लागणाऱ्या डॉ. हर्षवर्धन यांच्या ऐवजी नवीन आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मोदी मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांसोबत ही पहिलीच बैठक होती. व्हच्युअली झालेल्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सर्व ३० कॅबिनेट मंत्री सहभागी झाले होते.
प्रधानमंत्री श्री @NarendraModi जी के नेतृत्व में देश कोरोना महामारी के मौजूदा खतरे की रोकथाम और प्रबंधन के लिए तैयार है।
आज कैबिनेट ने ₹23,123 करोड़ का आवंटन करते हुए Emergency Response & Health System Preparedness Package: Phase-II को मंज़ूरी दी है। #CabinetDecisions pic.twitter.com/7j6a7sRnc2— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) July 8, 2021
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार आतापासूनच तयार असल्याचे आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. त्यासाठी सरकारने आधी १५ हजार कोटींचे पहिले पॅकेज दिले होते. त्या माध्यमातून कोव्हीड हॉस्पिटलची संख्या १६३ वरुन ४,३८९ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. आधी कोव्हीड हेल्थ सेंटर नव्हते आता ८,३३८ हेल्थ सेंटर तयार असल्याचे ते म्हणाले. सध्या चार लाख ऑक्सिजन बेडची संख्या झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आलेल्या अडचणी लक्षात घेवूनच नवीन २३ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. यातील १५ हजार कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करणा आहे तर ८ हजार कोटी रुपये राज्यांना दिले जाणार आहेत. लहान मुलांना होणारा धोका लक्षात घेता त्या दृष्टीने तयारी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- जागेअभावी हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम रखडले, इतर तीन प्रकल्प कार्यान्वित!
- शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे मूळ उद्दिष्ट – मंत्री बाळासाहेब पाटील
- बॉलीवूड दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांच्या भावाचे कोरोनामुळे निधन
- उद्योजकाला ब्लॅकमेलकरून १५ लाखांची खंडणी मागणारा गजाआड
- तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबाद मनपास जाहीर केलेला निधी अडकला कुठे?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

