राजस्थान : तब्बल वर्षभरापूर्वी आलेल्या कोरोना संकटाने संपूर्ण जगाला वेठीस धरल आहे. कोरोना संसर्ग, रुग्ण, लाॅकडाऊन आणि मृत्युदर हे चक्र गेल्या वर्षभरापासून जगभरात अनुभवले जात आहे. गेल्या काही महिन्यात कोरोनाची लाट ओसरली आहे. त्यानुसार लोकशाही प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली मात्र आता पुन्हा अनेक देशांमध्ये कोरणा ची दुसरी लाट आल्याने भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान कोविड १९ च्या पार्श्ववभूमीमुळे दिवाळीमध्ये फोडले जाणाऱ्या फटाक्यांच्या विषारी धुरापासून कोरोनाग्रस्तांच्या संरक्षणासाठी संपूर्ण राज्यात फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे धूर सोडणाऱ्या वाहनांवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आलेत. दिवाळीच्या तोंडावर राजस्थान सरकारने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घातली आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सांगण्यानुसार, कोरोना काळात राज्यातील नागरिकांच्या जीवाचं संरक्षण करणं महत्वाचं आहे. आतिशबाजीतून निर्माण होणाऱ्या धुरामुळे कोरोनाबाधितांसोबत हृदय आणि श्वासनाची आजारांनी असणाऱ्या रुग्णांनाही त्रास होतो. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत लोकांनी आतिशबाजी करू नये.
महत्वाच्या बातम्या
- अंबानी कुटुंबाची ‘झेड प्लस’ सुरक्षेविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
- वैभव नाईकांचा जबरदस्त पलटवार, राणेंच्या गडाला लावला सुरुंग
- शरद पवारांनी एकनाथ खडसेंना वाचवण्याचाच प्रयत्न केला : अंजली दमानिया
- कांदा खरेदीवर लावलेले निर्बंध उठवण्याबाब मुख्यमंत्र्याचे केंद्राला पत्र; आता उत्तराची प्रतीक्षा
- ‘सगळं उघड केलं ना तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
