Share

कांदा खरेदीवर लावलेले निर्बंध उठवण्याबाब मुख्यमंत्र्याचे केंद्राला पत्र; आता उत्तराची प्रतीक्षा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा ही २५ मे.टनावरून वाढवून १५०० मे.टन एवढी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीयग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पाठवले आहे.

सध्याची 25 मेट्रिक टन कांदा खरेदीची मर्यादा वाढवून ती 1500 मेट्रिक टनांपर्यंत वाढवावी अशी मागणी ठाकरे यांनी पत्रातून केली आहे. या निर्बंधांमुळे कांदा लिलाव बंद झाले असून, सर्वसामान्यांना त्याची झळ बसत असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

केंद्र सरकारने एपीएमसीतील कांदा खरेदीच्या तारखेपासून ग्रेडिंग पॅकेजिंग साठी ३ दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधी खूप कमी असून तो सात दिवसांचा करावा अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

जीवनावश्यक वस्तू कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाऱ्यांसाठी २५ मेट्रीक टन तर कांदा व्यापाऱ्यांसाठी २ मेट्रीक टन साठवणुकीचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापारी दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!