Share

अखेर राठोडांच्या राजीनाम्यावर ठाकरेंची स्वाक्षरी; मात्र राज्यपालांकडे राजीनामा पाठवणार ?

Published On: 

मुंबई : 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीचा वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली.चौफेर टीका झाल्याने तसेच महाविकास आघाडीच्या अडचणी देखील वाढू लागल्याने रविवारी या प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

दरम्यान, एका बाजूला राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत असले तरीही वास्तविक चित्र काही वेगळेच असल्याची चर्चा सुरु झाली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर आली होती. यानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. ‘राजीनामा फ्रेम करून ठेवण्यासाठी नव्हता असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र तरीही त्यांनी हा राजीनामा राज्यपालांकडे का पाठवला नाही ?’ असा सवाल भाजप नेत्यांनी केला होता.

अखेर राजीनामा देऊन आज चार दिवस झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यावर सही केल्याचं समजत आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या मंत्रिपदावरून हकालपट्टीवर शिक्कामोर्तब  झाला आहे. तर, लवकरच हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला जाईल, अशी माहिती देखील सूत्रांद्वारे समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!