Share

शुटिंगच्या वेळी घोड्याचा मृत्यू; दिग्दर्शक मणिरत्नम यांच्याविरोधात तक्रार दाखल

Published On: 

मुंबई : सौंदर्यवती व लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या आगामी चित्रपटाचे निर्देशक मणिरत्नम यांच्यावर नुकतीच तक्रार दाखल करण्यात आली.  गेल्या काही महिन्यापासून मणिरत्न दिग्दशिर्त ‘पान्नीयिन सेलवन’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटातून ऐश्चर्या राय बच्चनच्या अभिनयाची जादू लवकरच पहायला मिळणार आहे.

हा चित्रपट युध्दावर आधारित असल्याने घोडयांचा समावेश आहे, मात्र शुटींग दरम्यान एका घोडयाचा दुघटनेत मृत्यू झाला. या घटनेनंतर ‘पीईटीए’ ने मणिरत्नमच्या प्रॉडक्शन हाऊस तसेच घोडयाच्या मालका विरोधात प्राथमिक स्वरूपाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पशु कल्याण बोर्ड ने दिग्दशक मणिरत्नम यांची चौकशी देखील केली होती.

हा चित्रपट पाचशे करोडच्या आसपास बजेटचा असून पहिला पोस्टर नुकताच लाँच झाला आहे. चित्रपटात ऐश्चर्या राय बच्चनसह अलावा चियान विक्रम, तृषा कृष्णन, जयम रवी आदींसह कलाकारांचा समावेश आहे. ही घटना हैद्राबादमध्ये सुरू असलेल्या शुटींग दरम्यान घटल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सध्या चित्रपटाचे शुटींग ओरछा, मध्यप्रदेशात सुरू असून,
मणिरत्नम निर्देशित या चित्रपटास एआर रहेमान यांचे संगीत असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!