मुंबई : ठाकरे सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाट धरली आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांनी मनसेमध्ये प्रवेश केला. यामुळे खुद्द शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मनसे प्रवेश केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी देखील ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ” वरळी मतदारसंघातले शेकडो शिवसैनिक दुसऱ्या पक्षात गेले. बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री, मतदारसंघात 2 माजी आमदार तरीही मोठ्या प्रमाणात लोक शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात चालले आहेत. मुंबईच्या वरळी मतदार संघात सामान्य लोकं स्थानिक आमदाराच्या नावाने शिव्या घालत आहेत.” असा घणाघात निलेश राणेंनी केला आहे.
वरळी मतदारसंघातले शेकडो शिवसैनिक दुसऱ्या पक्षात गेले. बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री, मतदारसंघात 2 माजी आमदार तरीही मोठ्या प्रमाणात लोक शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात चालले आहेत. मुंबईच्या वरळी मतदार संघात सामान्य लोकं स्थानिक आमदाराच्या नावाने शिव्या घालत आहेत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 19, 2020
“लोकप्रतिनिधी कसा असावा, तर लोकातला असावा. वरळी मतदारसंघातील मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत निवडून दिलं होतं, पण काही महिन्यातच इथल्या मतदारांना त्यांच्या कामाची प्रचिती आली. सध्या कोणतीही निवडणूक नाही. परंतु राज ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा या नागरिकांनी व्यक्त करत मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे” असे मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणाला छगन भुजबळांचा विरोध’ ; भेट न दिल्याने आंदोलकांनी व्यक्त केली नाराजी
- ‘ही तर मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक’ ; राज्य सरकारला संभाजीराजेंचा तीव्र इशारा
- मराठा मोर्चा समन्वयकांच्या भेटीबाबतच्या चुकीच्या बातम्या पसरवू नका – छगन भुजबळ
- शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारला जाग येईल का? सामनातुन केंद्र सरकारला खडेबोल
- इंदुमिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यास माझा विरोध : प्रकाश आंबेडकरांचा गौप्य स्फोट


