🕒 1 min read
लातूर : मराठवाड्यातील शेतकरी कायमच दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या छायेत जगत आहे. अशा परिस्थितीत त्याला पीककर्ज आणि पिक विमा यांचा आधारा आहे. लातूर मधील शेतकऱ्यांनसंदर्भात वाढीव रक्कम न भरलेला एकही शेतकरी अक्रियाशील होणार नाही, या संबंधी घोषणा करावी, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी दिपीप देशमुख यांचो भेट घेतली.
आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, ‘श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकंबी, एकंबीवाडी व एकंबीतांडा ही गावे समाविष्ट करावीत, सभासदांना शेअर्स पूर्ततेसाठी जिल्हा बँकेमार्फत वाढीव पीककर्ज मंजूर करावे किंवा वाढीव रक्कम न भरल्याने एकही शेतकरी अक्रियाशील होणार नाही असे घोषित करावे तसेच खरोसा येथे जिल्हा बँकेची शाखा सुरु करण्यात यावी अशी विनंती केली. माझ्या तिन्हीही मागण्यांबाबत तांत्रिक माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेण्याविषयी दिलीपराव देशमुख यांनी आश्वासित केले आहे.’
या मागण्यांसाठीचे एक निवेदनही आमदार पवार यांनी देशमुख यांना दिले आहे. या संबंधीची माहिती आमदार पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर दोघांमध्ये चर्चा झाली. या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना ईडीने लूक आऊट नोटीस बजावल्यानंतर फडणवीसांनी दिला ‘हा’ सल्ला
- …म्हणून संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात भाजपने दाखल केली तक्रार
- जावेद अख्तर यांनी केलेले वक्तव्य तालिबानमध्ये केले असते तर चौकात फटके मारले असते- सुधीर मूनगंटीवार
- ‘संजय राऊत हळूहळू खरं बोलायला लागलेत’; आशिष शेलार यांचा खोचक टोला
- सण-उत्सव नंतरही साजरे करू…हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल – मुख्यमंत्री ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
