Share

शेतकऱ्यांनी पुढे येऊन मुद्द्यांवर बोलावं ; मोदी सरकार चर्चेला तयार : निर्मला सीतारामन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी चर्चा करायची आहे. त्यांनी पुढे येऊन आपले मुद्दे मांडावेत, असंच आम्हाला वाटतं. आम्ही चर्चेला तयार आहोत. कृषी कायदे सरकारने केले म्हणजे ते अंतिम नाहीत, चर्चेची द्वारं खुली आहेत, असं निर्मला सीतारामन यांनी कृषी कायद्यांविषयी बोलताना सांगितलं.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाव्हायरसच्या काळातला सर्वात आव्हानात्मक अर्थसंकल्प सोमवारी सादर केला. विरोधकांनी कृषी कायद्यांविषयी सुरू ठेवलेल्या गदारोळात त्यांनी भाषणाला सुरुवात केली तरी शेतीसाठी भरीव तरतूद त्यांनी अर्थसंकल्पात केली आहे. News18 ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत त्यांनी कृषी कायद्याविषयी सरकारची नेमकी भूमिका मांडली आणि अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदींचं स्पष्टीकरण दिलं.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की २०२१-२२ मध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक कृषी पतपुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. गेल्या वर्षी हे लक्ष्य १५ लाख कोटी होते, त्यामध्ये यावर्षी १.५ लाख कोटींची वाढ होऊन हे लक्ष्य १६.५ लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. तसेच अर्थमंत्री आपल्या भाषणात म्हणाल्या की, आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. सर्व पिकांवर उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट एमएसपी देण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!