औरंगाबाद : केंद्रातील मोदी सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात मागील सहा महिन्यांपासून शेतकर्यांचे आंदोलन दिल्लीच्या वेशीवर सुरू आहे. मात्र मोदी सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. याच पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने बुधवारी (दि.२६) देशभर मोदी सरकार निषेध दिन पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील विविध संघटनांनी पाठिंबा देत एसएफआयच्या औरंगाबाद जिल्हा समितीने यात सहभागी होऊन मोदी सरकार निषेध दिन पाळला.
दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला ६ महिने पूर्ण होत आहे. तसेच, कामगार वर्गांच्या देशव्यापी संपालाही ६ महिने पूर्ण होत आहे. तर दुसरीकडे भाजप सरकारलाही याच दिवशी ७ वर्षे पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमिवर संयुक्त किसान मोर्चाने देशभर मोदी सरकार निषेध दिन पाळण्याचे आवाहन केले होते.
या आवाहानाला अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (जमसं), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या तिन्ही संघटनांनी सक्रिय पाठिंबा जाहिर केला होता. दरम्यान, या संघटनांनी विविध मागण्या करत मोदी सरकार निषेध दिन पाळला. या आंदोलनावेळी मोदी सरकारने तिन्ही जनविरोधी कृषी कायदे आणि चारही कामगारविरोधी श्रमसंहिता ताबडतोब मागे घेण्याची मागणी केली आहे. या आंदोलनात घरे आणि वाहनांवर काळे झेंडे लावून, गावागावांत आणि वस्त्या-वस्त्यांत मोदी सरकारचे पुतळे जाळून देशभर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो महिला, युवा आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- म्युकरमायकोसिसवर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी रुग्णांची माहिती अपडेट ठेवा- जिल्हाधिकारी
- तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना किती मदत मिळणार ? राज्य सरकारने जाहीर केली आकडेवारी !
- मंत्रिमंडळ बैठकीत ‘पदोन्नती’बद्दल निर्णय नाही, नाराज नितीन राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- ‘जाणत्या पवारांना बारवाल्यांची असलेली कळकळ लक्षात घेऊन ठाकरे सरकारने दारूबंदी उठवली’
- हे दिवसही निघून जातील! काळजी घ्या, संयम बाळगा मनोविकारतज्ज्ञांचे आवाहन


