औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील शेतकरी काही भागात हरणामुळे तर काही भागात रानडुक्कर उपद्रवामुळे लावलेल्या कवळ्या पिकांची नासाडी करण्याचा उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले आहे. असे असताना वन विभाग या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञता दाखवत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे.
लालमाती ते सतकुंडा सुलीभंजन परिसरातील शेतकरी रानडुक्कर उपद्रवामुळे हैराण असुन शेतात उगवलेल्या कोवळ्या पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकरी हवालदील झालेले आहेत. म्हैसमाळ परिसरातील शेतक-यांनी अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी केली असून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही वन विभागाच्या वतीने करण्यात येत नसल्याने शेतक-यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
म्हैसमाळ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील अद्रक पिकांची नासाडी करुन हजारो रूपायाचे उगवलेल्या कोवळ्या आले बेन्याची नासाडी केली. त्यामुळे लवकरच रानडुक्करांचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध !
- ‘नानांच्या नाना तऱ्हा; ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी…’
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- ‘मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं करोना परिस्थिती हाताळण्यातलं अपयश लपत नाही’
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

