Share

‘आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळं शेतकरी बेहाल’, आ. अभिमन्यू पवार यांचा आरोप

Published On: 

लातूर: आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळं शेतकरी बेहाल झाले आहेत तर ४ हजार कोटींपेक्षा अधिकच नफा कमावून विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत, असे वक्तव्य आमदार अभिमन्यू पवार यांनी एका पत्रकार परिषदेत केले आहे. एकट्या लातूर विभागात विमा कंपन्यांनी १८०० कोटी रुपयांचा नफा कमावला असून सरकार मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून अंतर्गत कुरघोड्यांमध्ये व्यस्त असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री तथा भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांनी लातूर येथे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला तसेच पत्रकार परिषद घेऊन पीकविमा व शेतकऱ्यांशी निगडित इतर विषयांबाबत पत्रकारांशी संवाद साधला. २०१९ च्या तुलनेत २०२० साली सोयाबीन व इतर खरीप पिकांच्या उत्पादनात ५०% पेक्षा अधिकची घट झालेली आहे. २०१९ साली शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला होता पण २०२० साली मात्र जवळपास ९०% पात्र शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत, असे मत यावेळी बोंडे यांनी व्यक्त केले.

यावेळ आ. अभिमन्यू पवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच टीका केली आहे, जनादेश प्राप्त केलेल्या सरकारला जनमताची आदरयुक्त भीती असते पण जनतेवर लादलेल्या या आघाडी सरकारला ना शेतकऱ्यांची चिंता आहे ना या सरकारचा विमा कंपन्यांवर वचक आहे. आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळं शेतकरी बेहाल झाले आहेत तर ४ हजार कोटींपेक्षा अधिकच नफा कमावून विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत. एकट्या लातूर विभागात विमा कंपन्यांनी १८०० कोटी रुपयांचा नफा कमावला असून सरकार मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून अंतर्गत कुरघोड्यांमध्ये व्यस्त आहेत, अशी टीका पवार यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!