Share

फडणवीसांनी युपीमध्ये लक्ष घालावं; महाराष्ट्र सांभाळण्यासाठी मविआ समर्थ आहे – काँग्रेस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

एकाबाजूला मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना हाताळण्याच्या उपाययोजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. असे असताना उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघडीतील नेत्यांनी त्यांच्यावर चांगलंच टीकास्त्र सोडलं आहे. आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी, फडणवीसांनी युपीसह अन्य भाजपशासित राज्यांमध्ये लक्ष घालावं, असा टोला लगावला आहे.

‘उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकारी फोनही उचलत नाहीत; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याचे आदित्यनाथ यांना पत्र. त्यामुळे देवेंद्र फडणवीसजींनी युपी व अन्य भाजपा शासित राज्यांमध्ये लक्ष घालावे. मविआ सरकार महाराष्ट्र सांभाळण्यासाठी समर्थ आहे, इथे फार त्रास घेण्याची आवश्यकता नाही,’ असं सचिन सावंत यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!