Share

‘फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद दिलं नाही ही चूक होती’

Published On: 

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी शिवसेना-भाजपच्या काळात शिवसेनेला अडिच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. विक्रम गोखले हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी सेना-भाजप युतीबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता ते काय म्हणाले हे गोखलेंनी सांगितलं आहे.

शिवसेना-भाजपची युती झाली नाही. त्याबाबत मी देवेंद्र फडणीसांना विचारणा केली. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद का दिलं नाही? असा प्रश्न मी फडणवीसांना विचारला. त्यावर फडणवीसांनी चूक झाल्याचं सांगितलं, असा खळबळजनक दावा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केला आहे. गोखले यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली असून राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत.

शिवसेना-भाजपला एकत्रं आणण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत. अडीच वर्ष शिवसेनेला दिले असेल तर काय बिघडलं असतं असा प्रश्न मी एकदा फडणवीसांना विचारला होता. त्यातही आधीची अडीच वर्ष तुम्हाला हवी की नंतरची हवी? असा सवालही मी त्यांना केला होता. त्यावर चूक झाली असं फडणवीस मला म्हणाले होते, असा दावा विक्रम गोखले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!