🕒 1 min read
मुंबई : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला घेरण्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. कोरोनाच कारण देत सरकारने केवळ ५ व ६ जुलै रोजी केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचं जाहीर केलं आहे. यावरून भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. आता अधिवेशनाची पूर्वतयारी करण्यासाठी राज्यातील प्रश्न मांडून रणनीती आखण्यासाठी आज भाजपची आज प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीच्या समारोपाच्या भाषणात बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. कोरोना काळातील आकड्यांची लपवाछपवी, भ्रष्टाचार, अपुरी मदत, मंत्र्यांमधला समन्वयाचा अभाव, आरक्षणाचा वाढता गुंता आदी मुद्द्यांवर भाष्य करताना फडणवीसांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
भाजप प्रदेश कार्य समिती बैठकीच्या समारोप सत्राला @Dev_Fadnavis यांनी महाबिघाडी सरकारची पिसं काढलीत. आरोग्य क्षेत्रातल्या अपयशापासून आरक्षणाबाबतच्या घोळापर्यंत त्यांनी ठाकरे सरकारच्या एकेक घोडचुकांचे पोस्टमॉर्टेमच केलेय. #महागोंधळी_सरकार pic.twitter.com/objkJJ8gdJ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 24, 2021
देवेंद्र फडणवीसांच्या या भाषणानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली आहे. ‘भाजप प्रदेश कार्य समिती बैठकीच्या समारोप सत्राला देवेंद्र फडणवीस यांनी महाबिघाडी सरकारची पिसं काढलीत. आरोग्य क्षेत्रातल्या अपयशापासून आरक्षणाबाबतच्या घोळापर्यंत त्यांनी ठाकरे सरकारच्या एकेक घोडचुकांचे पोस्टमॉर्टेमच केलेय. महागोंधळी_सरकार,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वॉटर ग्रीड योजनेस पैठण तालुक्यातून होणार सुरुवात, आ. संदीपान भुमरेंच्या प्रयत्नांना यश!
- चलो बुलावा आया है…! : दौरा अर्धवट सोडून नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना
- ‘त्या’ लेटरबॉम्ब प्ररकणात अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा; भाजपची मागणी
- ‘भाजपनेच दोन मंत्र्यांना घरी पाठवलंय, त्याचाच धसका या ठाकरे सरकारने घेतलाय’
- जिओचा आता सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन ‘या’ तारखेला येणार बाजारात !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
