मुंबई : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला घेरण्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. कोरोनाच कारण देत सरकारने केवळ ५ व ६ जुलै रोजी केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचं जाहीर केलं आहे. यावरून भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. आता अधिवेशनाची पूर्वतयारी करण्यासाठी राज्यातील प्रश्न मांडून रणनीती आखण्यासाठी आज भाजपची आज प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे. ‘सातत्याने आंदोलन करून भाजपाने सरकारवर विरोधी पक्ष म्हणून अंकुश ठेवण्याची भूमिका समर्थपणे बजावली. भाजपाच्या दबाबामुळेच दोन मंत्र्यांना घरी पाठविण्यात आले, त्या अधिवेशनाचा धसका घेऊन ठाकरे सरकारने आगामी अधिवेशन हे केवळ दोन दिवसाचे आयोजित केलं आहे,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
सातत्याने आंदोलन करून भाजपाने सरकारवर विरोधी पक्ष म्हणून अंकुश ठेवण्याची भूमिका समर्थपणे बजावली. भाजपाच्या दबाबामुळेच दोन मंत्र्यांना घरी पाठविण्यात आले, त्या अधिवेशनाचा धसका घेऊन ठाकरे सरकारने आगामी अधिवेशन हे केवळ दोन दिवसाचे आयोजित केले आहे. pic.twitter.com/djkTml6Oep
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 24, 2021
अजित पवारांची सीबीआय चौकशी करा !
सचिन वाझेनंतर परमबीर सिंग यांनी देखील लेटरबॉम्ब टाकून अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळील व्यक्तीचं नाव घेत गंभीर आरोप केले होते. यानंतर, भाजपने अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता, थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे. अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मांडला गेला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘५१८ चित्रपटांमध्ये काम करूनही मला ओळखल नाही’ ; डबक्यात बुडून मरण्याची वेळ आलीये’ ; व्हिडीओ होतोय व्हायरल
- चलो बुलावा आया है…! : दौरा अर्धवट सोडून नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना
- ‘त्या’ लेटरबॉम्ब प्ररकणात अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा; भाजपची मागणी
- रंग बदलण्याबाबतचा टोमणा मुख्यमंत्र्यांनी नेमका कुणाला मारला ?
- ‘मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक वाझे’; फडणवीसांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

