Share

अखेर अण्णांची मनधरणी करण्यात फडणवीसांना यश !

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली होती. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार असं चित्र निर्माण झालं होतं.

अण्णांनी या वयात उपोषण करू नये यासाठी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरु होत्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुमारे आठवड्याभरापासून प्रयत्न सुरु केले होते. आधीच्या काही मागण्या केंद्र सरकारने आश्वासन देऊन देखील पूर्ण केल्या नव्हत्या, यामुळे नाराज होऊन अण्णा हजारे यांनी त्या मागण्या व कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ३० जानेवारी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनापासून उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती.

मात्र, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस व भाजपच्या इतर नेत्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन आज पुन्हा एकदा अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी, केंद्र सरकारतर्फे अण्णांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करुन त्यामाध्यमातून येत्या सहा महिन्यात प्रस्ताव पाठवला जाईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विनंतीचा मान ठेवून अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतल्याचं घोषित केलं आहे. कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस व अण्णा हजारे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन उपोषण मागे घेतल्याची माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!