Share

सत्तेत असताना जनतेशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती : मुख्यमंत्री

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहेत. तसेच एकमेकांवर टीका टिप्पणी करताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध सुरु झालेले पाहायला मिळत आहे. बीड येथील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या संवाद दौऱ्यावर टीका केली आहे. त्यांनी सुप्रिया सुळे यांनी सत्ता असताना जनतेशी संवाद साधला असता, तर ही वेळ आली नसती, असा टोला सुळे यांच्या संवाद दौऱ्याला लगावला आहे.

तसेच पुढे बोलताना विरोधी पक्षांच्या यात्रांना फारशी गर्दी जमत नाही, त्यामुळे त्यांना मंगल कार्यालयात सभा घ्याव्या लागत आहेत. सत्ता होती तेव्हा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई स्वतःशी संवाद करायच्या, त्यावेळीच जनतेशी संवाद केला असता तर ही वेळ आली नसती असं विधान केले. तसेच ज्यांनी लोकसभेत भाजपला विरोध केला, त्यांना बीडच्या जनतेने जागा दाखवली. पुढच्या टप्प्यात काँग्रेसचे काही आमदार आमच्या यात्रेचं स्वागत करणार आहेत. ते स्वागत आम्ही स्वीकारणार आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षांतर केलेल्या नेत्यांना स्वच्छ करण्यासाठी सरकार कोणती वाशिंग पावडर वापरत आहे असा प्रश्न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे असं उत्तर दिले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!